➲ मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज :-
🚩 " अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी ,
उधळण होईल भगव्या रक्ताची आणि
शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
![]() |
जाणता राजा |
शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 पुण्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला.महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजीराजे भोसले होते. वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते.
शिवाजी महाराज हे मराठा
सम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या
वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.त्यांनी 'गामिनी कावा ' तंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. त्यांनी
शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रुंचा पराभव केला. 06 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांनी
राज्याभिषेक झ्हाला. त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांना सामान न्याय व सामानतेची
वागणूक दिली. दुर्दैवाने, 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराज्यांनी अखेरचा स्वा्श घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज हे एक थोर पुरुष होते .आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो.आपण सर्व त्यादिवशी किती आनंदात असतो.महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणतो,पोवाडे म्हणतो,त्यांच्या फोटो ला हार घालतो.मोठ्या उत्साहाणे "छत्रपती शिवाजी महाराज कि जय "असा महाराजांच्या नावाचा जयजयकार करतो.
शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता .त्या काळी सर्वत्र राजेशाही अंमल असे.बरेचं राजे प्रराजे हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत;पण त्या काळातही असे काही राजा होऊन गेले,की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले .उत्तरेतील मुघल सम्राट अकबर ,दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कळण्यासाठी राजवटींबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत.त्यांच्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्टात स्वराज्य निर्माण केले.स्वराज्य म्हणजे स्वतः चे राज्य .महाराजांपुर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते.महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाहा आणि विजापूरचा आदिलशाहा या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता.ते मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते.या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते.त्यांच्यात नेहमी लढाया होत.त्यात रयतेचे हाल होत .रयत सुखी नव्हती .उघडउघड उत्सव करणे,पूजा करणे धोक्याचे झाले होते.रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते.रहायला सुरक्षित निवाराही नव्हता .सगळीकडे अन्याय माजला होता.महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख,देशपांडे इत्यादी वतनदार होते , पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते.देशावर त्यांचे प्रेम नव्हते.प्रेम होते फक्त वतनावर,जहागिरीवर ,वतनासाठी ते एकमेंकाशी भांडत.आपापसात लढत.त्यात रयतेचे खूप हाल होत.या साऱ्या गोष्ठीमुळे रयत त्रासून गेली होती.सगळीकडे अंधाधुंनी माजली होती.
शिवाजी महाराजांनी हे सारे पहिले.रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करण्याचे पवित्र त्यांनी हाती घेतले.भांडखोर वतदारांना त्यांनी वठणीवर आणले.स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला.तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली.जुलमी राजवटींचा पराभव केला.न्यायचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले.हे स्वराज्य सेवा जातीधर्मांच्या लोकांचे होते.स्वराज्यात कोणताही भेदभाव केला नाही.सर्व धर्मातील साधुसंतांचा त्यांनी सम्मान केला.अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली, कि आपल्याला प्रेरणा मिळते, स्फ्रर्ती मिळते.
शिवाजी महाराजांचे कार्य आजही आपल्या
सर्वांना प्रेरणा देते. छत्रपती
शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे
होते.त्यांनी थोर तत्ववेत्यांच्या शिकवणुकीतून स्फृती घेतली होती .वैयत्तिक
महात्त्वाकांक्षेतून केवळ स्वतः साठी राज्य स्थापन करण्याची त्यांना इच्छा
नव्हती.तत्कालीन राज्य पद्धतींच्या गुणावगुणांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून
आपले वैशिष्ट धोरण व राज्यव्यवस्था यांची आखणी केली.महाराज स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते
.तसेच इतर धर्माविषयीची त्यांची भावना सहिष्णूतेची होती.इतर धर्मीयांच्या पूज्यं
स्थानासाठी त्यांनी इनामे दिली.शिवाजी महाराज एक थोर सेनानी
होते.स्वतंत्ररक्षणासाठी आरमाराची आवश्यकता व महत्व त्यांना पटले होते.इंग्रज व डच
यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारले .प्रतापगड
किल्ल्याच्या बांधणीत त्यांची युद्धशास्रातील निपुणता दिसून येते.छत्रपती शिवाजी
महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे तर ते साक्षात
प्रतिक होते.
समर्थ रामदासांनी
असे म्हंटले आहे कि,धर्मासाठी
बलिदान होईन मरा,मारा
आणि स्वराज्य प्राप्त करा.हे वचन त्यांच्या अनेक भक्तांनी ऐकले,पण पूर्ण
रुपात ज्यांनी ते साकार केले ,ती थोर व्यक्ती म्हणजे राजे शिवाजी महाराज.
👉शिवजन्म :-
ते दिवस फार धामधुमीचे होते.उत्तरेकडून मुघल बादशहा शाहजहान याने दख्खन से करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते.शहाजीराजांच्या जहागिरीचे जाव पुणे.विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकले होते.शहाजीराजे अडचणीत सापडले होते.इकडे आड तिकडे विहीर!शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष आले.अशात जिजाबाई गरोदर होत्या ,तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे,हा प्रश्न उभा राहिला.शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली.जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले.शिवनेरी हा पुणे जिल्ह्यांतील जुन्नरजवळील किल्ला.त्यांच्या चारी बाजूंनी उंच कडे भक्कम ततबंधी आणि बळकट दरवाजे होते.किल्ला मोठा मजबूत होता.विजयराज हर त्याचे किल्लेदार होते.ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते.जिजाबाईच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले.
आणि तो सोन्याचा दिवस उजाडला.फाल्गुन वद्य तृतीय शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३०.शिवनेरीच्या नगारखान्यात सनई,चौघडा वाजत होता.अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला आला.किल्ल्यावर आनंदीआनंद झाला.बाळाचे बारसे झाले.शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव "शिवाजी" ठेवले.
➤ शिवरायांचे बालपण :-
![]() |
शिवनेरी |
➨ स्वराज्यस्थापनेचे कार्य :-
➦ शिवराज्याभिषेक सोहळा :-
⇒ शिवरायांचे शिक्षण :-
👉शिवरायांची राजमुद्रा :-
![]() |
राजमुद्रा |
शिवरायांच्या नावाने जहागिरीत कारभार सुरु झाला होता.शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती.ती मुद्रा अशी -
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
👉हिंदवी स्वराज्य :-
👉स्वराज्याची राजधानी :-
➦ छत्रपती शिवरायांचे आई वडील :-
- शहाजीराजे भोसले - वडील
- राजमाता जिजाऊ - आई
➦ छत्रपती शिवरायांचे बहिण / भाऊ :-
- संभाजीराजे - शिवाजी महाराजांचा भाऊ
- व्यंकोजी - सावत्र भाऊ
- संताजी - सावत्र भाऊ
➦ छत्रपती शिवरायांच्या पत्नी :-
- सईबाई
- सगुणाबाई
- सोयराबाई
- गुणवंताबाई
- काशीबाई
- सकवारबाई
- लक्ष्मीबाई
- पुतळाबाई
➦ छत्रपती शिवरायांची मुले / मुली :-
- धर्मवीर संभाजी राजे - सईबाई चा मुलगा
- कमलाबाई - सकवारबाई ची मुलगी
- दीपाबाई - सोयाराबाई ची मुलगी
- राजाराम - सोयराबाई चा मुलगा
- राजकुंवरबाई - सगुणाबाई ची मुलगी
- सखुबाई,राणूबाई,अंबिकाबाई - सईबाई च्या मुली
➦ छत्रपती शिवरायांची नातवंडे :-
- शाहू महाराज
- भवनीबाई
- शिवाजी ( दुसरे )
- अंबिकाबाई
- संभाजी ( दुसरे )
➨ छत्रपती शिवरायांचे विचार व्यक्त करणारे काही वाक्य :-
- स्वातंत्र्य हे एक वरदान आहे त्याला प्रत्येकजण पात्र आहे .
- संकटाला सामोरे जाणे आवश्यक नाही , शत्रूला तोंड देणे आवश्यक आहे .
- सूड माणसाला जळत नसतो , संयम हाच सुडावर नियंत्रण ठेवण्याचा एकमेव मार्ग .
- छोट्या ध्येयावर एक लहान पाऊल , नंतर मोठे ध्येय साध्या करते .
" रायगडाच्या मंदिरी वसे माझा राया
चाराणार्थी अर्पितो आजन्म ही काया
जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया
छत्रपती शिवाजी महाराज की जय "